Total Pageviews

छत्रपती शिवाजी महाराज- स्पेशल टेस्ट

 छत्रपती शिवाजी महाराज- स्पेशल टेस्ट 

    प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस... सिहांसनाधीश्वर...  योगीराज... श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!...



    आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना ,आपल्याला शिवाजी महाराज्यांवर हमखास प्रश्न विचारले जातात . आणि आपण महाराष्ट्रीयन म्हणून किंवा भारतचे नागरिक म्हणून सुद्धा महाराज्यांबाद्द्ल माहिती माहित असणे आवश्यक आहे .

छत्रपती शिवाजी महाराज- स्पेशल टेस्ट


आज तुम्ही  छत्रपती शिवाजी महाराज- स्पेशल टेस्ट  सोडवायची आहे .

या टेस्ट चा व्हिडियो पहा 



          छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?  

       1) खेड     2) जुन्नर   3)मावळ     4)पुरंदर

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला

1) 6 जून 1674   2) 3 एप्रिल 1659    3) 1 मे 1674      4) 6 जून 167

 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.

1) शिवनेरी    2) पुरंदर    3) सिंहगड   4) रायगड

राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.

1)गागाभट्ट   2)सभासद   3) बाबसाहेब पुरंदरे   4)म.गो रानडे

 छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.

1)राजगड   2)प्रतापगड   3)सिंहगड    4)रायगड

 

चुकीचा पर्याय निवडा

1)वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.

2)छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.

3)निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले

4)स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली

शिवरायांचा जन्म कधी व कोठे झाला?

1) 19 फेब्रुवारी 1627 शिवनेरी येथे

 2) 19 फेब्रुवारी 1630 सिंहगड येथे

3) 19 फेब्रुवारी 1625 शिवनेरी येथे

4) 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी येथे

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.

1)प्रतापगड  2) पुरंदर  3) राजगड  4) रायगड 

चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.

1) 632   2) 344   3) 320    4)  640 

युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.    

1) रायगड  2)सिंधुदुर्ग  3) मुरुड जंजिरा   4) गोपाळगड

पुरंदरचा पराक्रम खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

१) हिरोजी फर्जंद

२) फिरंगोजी नरसाळा

३) मुरारबाजी

४) तानाजी मालुसरे


आग्र्याहून येताना शिवरायांनी संभाजीराजांना कोठे ठेवले?

१) मथुरा

२) झाशी

३) दिल्ली

४) आग्रा


वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे ?

१) भोर

२) मंडणगड

३) शाहुवाडी

४) रोहा

 

खालीलपैकी कोण शिवरायांचे सहकारी नव्हते

१) फिरंगोजी नरसाळा

२) प्रतापराव गुजर

३) वीर बाजी पासलकर

४) चंद्रकांत मोरे

 

शिवरायांनी तोरणा किल्ल्यांचे नाव कोणते ठेवले?

१) प्रतापगड

२) राजगड

३) प्रचंडगड

४) सिंहगड

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले ?

१) शिवनेरी

२) राजगड

३) रायगड

४) तोरणा

 

दक्षिणेतील तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते ?

१) व्यंकोजी महाराज

२) संभाजी महाराज

३) मालोजी महाराज

४) लखोजी महाराज

 

शाहिस्तेखानाचा बीमोड करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती तारीख निश्चित केली होती?

१) ५ एप्रिल १६६३

२) ६ जून १६७४

३) ५ जुलै १६५५

४) ४ एप्रिल १६६३

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?

१) रायगड

२) राजगड

३) शिवनेरी

४) विशाळगड

 

राज्याभिषेकाचे पौरोहित्य करणारे गागाभट्टांचे मूळचे घराणे कोणते?

१) काशी

२) पैठण

३) नाशिक

४) वाराणसी

 

शिवरायांनी सावित्री हा किताब कोणाला दिला?

१) सावित्रीबाई फुले

२) यल्लम्मा पाटील

३) मल्लम्मा देसाई

४) राधाबाई देसाई

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकावेळी कोणते मंडळ निर्माण केले ?

न्यायमंडळ

खजिना मंडळ

अष्टप्रधान मंडळ

सभा मंडळ

 

अफजलखानाच्या भेटीस जाताना शिवरायांचे वकील कोण होते?

१) सिद्दी इब्राहिम

२) कृष्णाजी भास्कर

३) मोरेश्वर पंडित

४) पंताजी गोपीनाथ

 

 

पावनखिंडीतील पराक्रम खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

१) बाजीप्रभू देशपांडे

२) फिरंगोजी नरसाळा

३) मुरारबाजी

४) तानाजी मालुसरे

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले?

१) ऑक्झिंडेन

२) गागाभट्ट

३) रामदास स्वामी

४) अण्णाजी दत्तो

 

शिवरायांनी मालवण जवळील कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला?

१) कुर्णे

२) कुर्ला

३) कुरटे

४) कार्लोस

 

पुढीलपैकी जलदुर्ग नसलेला पर्याय कोणता?

१) जंजिरा

२) सिंधुदुर्ग

३) जिंजी

४) सुवर्णदुर्ग

 

मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती ?

१) फलटण

२) जावळी

३) वेरुळ

४) वाई

 

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून कधी निसटले ?

१) १६६६

२) १६५६

३) १६५२

४) १६६५

 

गडकोटांचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणाची नेमणूक केलेली नव्हती?

१) किल्लेदार

२) कारखानिस

३) अमात्य

४) सबनीस

 

"भारतीय आरमाराचे जनक " असे कोणास म्हटले जाते?

१) वास्को द गामा

२) छत्रपती शिवाजी महाराज

३) लॉर्ड मेकॉले

४) कृष्णदेवराय

 

शिवरायांच्या हेरखात्याचे प्रमुख कोण होते?

१) हिरोजी इंदुलकर

२) प्रतापराव गुजर

३) दर्यासारंग

४) बहिर्जी नाईक

 

चेन्नई च्या दक्षिणेस असणारा कोणता किल्ला शिवरायांनी जिंकून दक्षिणेत मजबूत ठिकाण निर्माण केले?

१) जंजिरा

२) तंजावर

३) जिंजी

४) वेलूर

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या साली सुरतवर स्वारी केली ?

१) १६६६

२) १६५६

३) १६६४

४) १६६५

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती ?

१) शिवराई

२) मोगलाई

३) पोतदार

४) लारी

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर कोणता बुलंद किल्ला बांधला ?

१) सिंधुदुर्ग

२) प्रतापगड

३) सिंहगड

४) राजगड

 

पुरंदरचा तह कधी झाला?

१) १६६५

२) १६५५

३) १६७४

४) १६६३

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते ?

१) ३४ मण

२) ३६ मण

३) ३२ मण

४) ३० मण

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला?

१) 3 मार्च 1629

२) 4 एप्रिल 1684

३) 19 एप्रिल 1680

४) 3 एप्रिल 1680

 

 

गनिमी कावा युद्ध तंत्र म्हणजे.......  अयोग्य पर्याय निवडा

१) भरपूर सैन्य घेऊन शत्रू वर आक्रमण करणे.

२) शत्रू वर अनपेक्षितपणे हल्ला करणे.

३) सोईच्या ठिकाणी थांबून शत्रू वर हल्ला करणे.

४) शत्रूला काही समाजाच्या आत सुरक्षित स्थळी पोहचणे.

 

कोणत्या तहानूसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले ?

१) तोरणा तह

२) पुणे तह

३) चित्तेड तह

४) पुरंदर तह

 

 

 

 

 

 

स्वराज्याची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती?

१) मराठी

२) फार्सी

३) संस्कृत

४) पाली

 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची प्रथम राजधानी कोणती होती ?

१) रायगड

२) राजगड

३) तोरणा

४) सिंहगड

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात मंत्री कोण होते ?

१) मोरो त्रिंबक पिंगळे

२) मोरेश्वर पंडित

३) दत्ताजी वाकनीस

४) रामचंद्र डबीर

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनतर गादीवर कोण बसले ?

१) छत्रपती राजाराम महाराज

२) छत्रपती संभाजी महाराज

३) छत्रपती शाहू महाराज

४) महाराणी ताराबाई

 

शिवरायांच्या आरमार दलामध्ये पुढीलपैकी कोण नव्हते?

१) अर्जोजी यादव

२) दौलतखान

३) तुकोजी आंग्रे

४) मायनाक भंडारी

 

कोंढाणा किल्ला कोणी सर केला?

१) तानाजी मालुसरे

२) शिवा काशिद

३) जिवा महाला

४) नेतोजी पालकर

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ?

१) मोरो त्रिंबक पिंगळे

२) निराजी रावजी

३) हंबीरराव मोहिते

४) रामचंद्र डबीर

 

" आज्ञापत्र " हा ग्रंथ कोणी लिहिला?

१) रामचंद्र अमात्य

२) रामदास स्वामी

३) न्या. गोविंद रानडे

४) मोरेश्वर पंडित

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान कोण होते ?

१) मोरो त्रिंबक पिंगळे

२) रामचंद्र मुजुमदार

३) दत्ताजी वाकनीस

४) रामचंद्र डबीर

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोणता इंग्रज वकील हजर होता ?

१) लॉर्ड माऊंटबॅटन

२) हेन्री आॉक्झिंडन

३) जसवंत सिंग

४) लॉर्ड डलहौसी

वरील प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी वरील टेस्ट सोडवा . 

Post a Comment

0 Comments